विश्वचषकासाठी पुरेसा सराव न झालेल्या भारतीय संघाची सलामीची लढत श्रीलंकेशी होणार असून आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाची थाटात सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.
गेल्या काही महिन्यांत भारतीय संघ बलाढय़ प्रतिस्पध्र्याविरुद्ध सामने खेळला नाही. त्यामुळेच भारतीय महिलांची सराव सामन्यातील कामगिरी संमिश्र होती.
भारताला न्यूझीलंडकडून १७ धावांनी पराभव पत्करावा लागला तर आर्यलडवर २६ धावांनी विजय मिळवला. मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेत श्रीलंकेकडून १-२ असे पराभूत झालेला मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी सज्ज झाला आहे. फलंदाजीत मिताली राज फॉर्मात असली तरी पूनम राऊतला खालच्या क्रमांकावर खेळवावे लागणार आहे.