ICC World Cup 2019 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक (११७) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (५७) व कर्णधार विराट कोहली (८२) यांची अर्धशतके यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३५२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले. सामन्यात धोनीने २७ धावा केल्या. त्यात त्याने १ षटकार लगावला. धोनीने फटकावलेला षटकार कायमच चर्चेचा विषय ठरतो, पण या सामन्यात त्याने खेचलेल्या षटकारानंतर विराटने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अधिक चर्चेचा विषय ठरली. ४९ व्या षटकात धोनीने पहिल्याच चेंडूवर स्टार्कला उत्तुंग असा षटकार लगावला. तो षटकार जातो की नाही हे विराट पाहत होता. पण धोनीचा तो फटका षटकार आहे, हे पाहिल्यावर विराटने जी प्रतिक्रिया दिली ती खरंच पाहण्यासारखी ठरली. हा पहा व्हिडीओ - Kohli reactions pic.twitter.com/v10q76ejRG — Bisu Kumar (@BisuKumar8) June 9, 2019 - #INDvAUS @ICC @cricketworldcup what the hell is wrong with you guys. Your English world feed production is so bad. You guys missed showing this epic Kohli reaction. This was instead shown on the Star sports Hindi feed to Indian audiences. @SkyCricket @FoxCricket @StarSportsIndia pic.twitter.com/Ide0NFWIdq — Suhas (@CricSuhas) June 9, 2019 त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात दमदार फटकेबाजी करण्याच्या विचाराने धोनीने फटका लगावला. जमिनीच्या जवळ असलेला फुल टॉस (Low full toss) चेंडू धोनीने पूर्ण ताकदीनिशी टोलवला, पण अत्यंत चपळाईने स्टॉयनीसने तो चेंडू एका हाताने रोखला आणि भन्नाट असा झेल टिपला. धोनीने १४ चेंडूत २७ धावा केल्या. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपापली अर्धशतके पूर्ण करून भारताला शतकी सलामी मिळवून दिली. सलामीवीर रोहित शर्माने ७० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. पण कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण धवनने विराटच्या साथीने डाव पुढे नेला आणि दमदार शतक झळकावले. शतक झाल्यावर मोठे फटके खेळताना धवन बाद झाला. मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात तो ११७ धावावर झेलबाद झाला. मिचेल स्टार्कने धवनला माघारी पाठवले आणि भारताला दुसरा धक्का दिला. धवनने १६ चौकार लगावले. त्यानंतर हार्दिक पांड्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्यात आली. त्याने त्याच्या बढतीचा पूर्ण उपयोग केला. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने ४८ धावा केल्या. २ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. कर्णधार कोहलीने एक बाजू लावून धरत दमदार ८२ धावा केल्या. तोदेखील मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. तर शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलने ३ चेंडूत ११ धावा केल्या आणि भारताला २५२ धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून स्टोयनीसने २ तर कुल्टर-नाईल, स्टार्क आणि कमिन्स यांनी १-१ बळी टिपला.