विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीसाठी भारत आणि न्यूझीलंड संघांचे नागपुरात आगमन झाले. आशिया चषकात आणि त्यानंतरच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. हाच फॉर्म कायम राखत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या स्वागताकरता विमानतळावर चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. त्यावेळी संघाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली होती. भारतीय संघ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जामठा मदानावर सराव करणार आहे. सलामीची लढत १५ मार्चला होणार आहे.