भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला, बुधवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर एका नकोश्या विक्रमाला सामोरं जावं लागलं. 2 टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने बाजी मारत विराट कोहलीचा विजयरथ थांबवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असताना कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मालिकेत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत घरच्या मैदानावर 16 मालिका खेळला आहे. यापैकी 15 मालिकांमध्ये भारताने विजय तर एका मालिकेत बरोबरी साधली आहे. First series defeat under Virat Kohli's captaincy at home for India in International cricket. This is also the first bilateral series defeat for India at home in any format since the start of 2016. #INDvAUS — Sampath Bandarupalli (@SampathStats) February 27, 2019 फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने 11 वर्षांत प्रथमच भारताला टी-20 मालिकेत पराभूत करण्याचा विक्रम केला आहे. भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. टी-20 मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. अवश्य वाचा - राहुल द्रविडमुळेच यशस्वी पुनरागमन करु शकलो – लोकेश राहुल