कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलने अखेरच्या टी-२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर १६४ धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय गोलंदाजांनीही आश्वासक कामगिरी करत न्यूझीलंडच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना झटपट माघारी धाडत, यजमानांना बॅकफूटवर ढकललं. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडने ३ फलंदाज माघारी परतले.

जसप्रीत बुमराहने मार्टीन गप्टीलला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यादरम्यान बुमराहने एक षटक निर्धाव टाकत, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं.

दरम्यान टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : सामन्याला सुरुवात होण्याआधीच जसप्रीत बुमराहचं अर्धशतक