भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना नेपियर येथे सुरु आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला अवघ्या १५७ धावांत गुंडाळले. १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव एकूण २ वेळा थांबवण्यात आला. पहिल्यांदा उपहाराच्या विश्रांतीमुळे खेळ थांबवण्यात आला होता. नियोजित वेळेआधी न्यूझीलंडचा डाव संपला. त्यामुळे भारताला लगेच फलंदाजीसाठी यावे लागले आणि त्यानंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली. दुसऱ्या वेळी मात्र हा सामना एका विचित्र कारणासाठी थांबवण्यात आला. अति सूर्यप्रकाश असल्यामुळे हा सामना थांबवावा लागल्याचा प्रकार या सामन्यात घडला. Sun halts play in Napier! India are 44/1 in 10 overs, and they need 114 more runs to win the first ODI against New Zealand. Follow #NZvIND live pic.twitter.com/CW6DpqnuyP — ICC (@ICC) January 23, 2019 फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या प्रकाशामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो, पण आज अति प्रकाशामुळे खेळ थांबला. भारताची धावसंख्या १ बाद ४४ धावा अशी असताना खेळ थांबवण्यात आला होता. यावर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत.. Why should rain have all the fun? #NZvIND — Akhil Babu (@Akhil7Cena) January 23, 2019 - Please Somebody Call Koi Mil Gaya Ka Jadu For Playing For India Kyu Ki Jadu Ko Dhup Chahiye — Rinkita Jain (Cutie Pie) (@JainRinkita) January 23, 2019 - Sophisticated players cricket has to be played indoor then — JS (@smartmailerjyes) January 23, 2019 - We used to play irrespective of sun in our gullies lol— Abhayy-kun (@MrThongss) January 23, 2019 - दरम्यान, खेळ थांबवण्यात आल्यामुळे सामना १ षटकाने कमी करण्यात आला होता आणि आव्हान १ धावेने कमी करण्यात आले होते.