विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या ५ फलंदाजांपैकी ४ फलंदात हे त्रिफळाचीत होऊन माघारी परतले आहे. या कामगिरीसह मोहम्मद शमीला दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दुसऱ्या डावात ५ बळी घेणारे गोलंदाज - करसन घावरी - विरुद्ध इंग्लंड (मुंबई १९७७) कपिल देव - विरुद्ध इंग्लंड (मुंबई, १९८१) मदन लाल - विरुद्ध इंग्लंड (मुंबई, १९८१) जवागल श्रीनाथ - विरुद्ध दक्षिण आफ्रिका (अहमदाबाद, १९९६) मोहम्मद शमी - विरुद्ध दक्षिण आफ्रिका (विशाखापट्टणम, २०१९)* याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात ५ बळी घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ४ बळी घेत शमीला चांगली साथ दिली. अवश्य वाचा - Ind vs SA : दुसऱ्या डावात मोहम्मद शमीचा मारा ठरतोय अधिक भेदक…जाणून घ्या आकडेवारी