भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मोहालीच्या मैदानावर आज दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात हवामानाची स्थिती काय असेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मोहालीमध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे. संध्याकाळी ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय रंगणार हे निश्चित झालं आहे.

मोहालीचं मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जातं. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.