तिरुवनंतपूरम : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त २० षटकांचा खेळ होऊ शकला; परंतु तरीही भारत ‘अ’ विजयाच्या उंबरठय़ावर आहे.

भारतीय गोलंदाजांनी बुधवारी चार फलंदाजांना बाद करीत दक्षिण आफ्रिकेची ९ बाद १७९ अशी अवस्था केली. त्यामुळे आफ्रिकेच्या खात्यावर फक्त ४० धावा जमा आहेत. शाहबाझ नदीमने ३, तर जलाज सक्सेनाने २ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : १६४

भारत ‘अ’ (पहिला डाव) : ३०३

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (दुसरा डाव) : ५५ षटकांत ९ बाद १७९ (हेन्रिच क्लासीन ४८, झुबेर हम्झा ४४; शाहबाद नदीम ३/१७).