ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि १६६ धावांची आघाडी घेतली. That's Stumps on Day 3 of the 1st Test.#TeamIndia 151/3 (Pujara 40*, Ajinkya 1*), lead by 166 runs. Scorecard - #AUSvIND pic.twitter.com/S7g9VlgrT4 — BCCI (@BCCI) December 8, 2018 ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपल्यानंतर भारताकडून सलामीवीरांनी ६३ धावांची सुरुवात मिळवून दिली. मुरली विजय १८ तर लोकेश राहुल ४४ धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यावर कोहली पुजाराने डाव सावरला. Here comes the 50-run partnership between the duo#TeamIndia 130/2, lead by 145 runs. Live - #AUSvIND pic.twitter.com/VslXQsicd0 — BCCI (@BCCI) December 8, 2018 कोहली ३४ धावांवर बाद झाला. मात्र पुजारा ४० धावांवर नाबाद आहे. स्टार्क, हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी टिपला. त्याआधी, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही ७ बाद १९१ अशी होती. तिसऱ्या दिवसाच्या खेळात पावसाने दोन वेळा व्यत्यय आणल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपल्या धावसंख्येत ४४ धावांची भर घालू शकले. ट्रेव्हिस हेडने अर्धशतकी (७२) खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्नही अपुरे पडले. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना माघारी धाडत भारताला पहिल्या डावात १५ धावांची आघाडीवर घेतली. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने ३-३, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने २-२ बळी टिपले.