बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारीने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीतावस्थेकडे नेला. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची जास्त संधी होती. पण अखेरीस हनुमा विहारी आणि आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. हनुमा विहारीच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला कौतुक होत आहे. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली आहे. आणखी वाचा- विहारी-अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं; सिडनी कसोटी अनिर्णीत "फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही" असं सुद्धा बाबुल सुप्रियो यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. If Hanuma showed this little initiative of just standing& hitting the BAD BALLS for boundaries, India may hv got this historic win GIVEN that Pant did what no one expected•And, I am reiterating that it's ONLY the bad balls that cud hv been hit given Hanuma was set batman by then — Babul Supriyo (@SuPriyoBabul) January 11, 2021 आणखी वाचा- IND vs AUS: विहारी, अश्विनची धाकड खेळी! ४० वर्षांत पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम "हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासि विजयाची नोंद केली असती" असे बाबुल सुप्रियो म्हणाले. "कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार मारायला पाहिजे होते" असे बाबुल सुप्रियो म्हणाले.