भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. मैदानावरील पाण्याचा निचरा करण्यासाठीची यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनाही किमान पाच-पाच षटकांचा तरी सामना होईल, असे वाटत होते. मात्र थोडीशी उघडीप घेतल्यानंतर पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने सगळ्या आशा संपुष्टात आल्या. मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे बुधवारी (१८ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेकडे पाहात आहे. या मालिकेतून गुणी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट त्याच्यापुढे असेल. भारताने वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. परंतु आता खरी लढाई क्विंटन डी कॉक आणि कॅगिसो रबाडाच्या दक्षिण आफ्रिकेशी असेल. The rains continue and the match has officially been called off. See you in Chandigarh for the 2nd T20I #INDvSA pic.twitter.com/BjZ9Y7QAf2 — BCCI (@BCCI) September 15, 2019 आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.