टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

Video : “घरचं मैदान, पण धोनी कुठाय?” पत्रकाराच्या प्रश्नावर विराटचं उत्तर ऐकाच…

भारताने सामना जिंकत तब्बल ८४ वर्षांपूर्वीचा एका विक्रमाशी बरोबरी साधली. भारताने पहिल्यांदाच सलग दोन वेळा आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला दोनदा फॉलो-ऑन दिला नव्हता. त्यामुळे असा पराक्रम करण्याचा विक्रम भारताने केला. त्याचसोबत एका मालिकेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याचीही केवळ दुसरीच घटना ठरलीय. या आधी १९३५ साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी सलग तीन सामन्यांमध्ये फॉलो-ऑन देत सामने जिंकले होते. त्यानंतर आफ्रिकेला एकापेक्षा जास्त वेळा फॉलो-ऑन देण्याची किमया भारताने साधली.

IND vs SA : रवी शास्त्री म्हणतात, “भाड में गया पिच; २० विकेट निकालने है”

दरम्यान, भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

IND vs SA : आठ संघांना एकत्र जे जमलं नाही, ते एकट्या टीम इंडियानं करून दाखवलं…

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. त्यांचा डाव १३३ धावांत संपुष्टात आला. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.