भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून त्याचा परिणाम उभय संघांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेवर होणार नाही, अशी आशा पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष कासिम झिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल. दोन्ही देशांमध्ये असलेल्या हॉकी खेळाच्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा आहे.’’