इन्फोसिस संघाने एसीआय करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत टेक मिहद्र संघाला आठ गडी राखून पराभूत केले.
विनय कामत (३/५), संतोष देसाई (२/९) व प्रशांत पन्वर (२/११) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे टेक महिंद्रा संघाचा डाव ११.२ षटकांत केवळ ५१ धावांमध्ये कोसळला. त्यानंतर इन्फोसिस संघाने फक्त ७.२ षटकांत हे आव्हान पार केले. इन्फोसिस संघाच्या संदीप अभ्यंकर याला अंतिम सामन्याचा मानकरी पारितोषिक देण्यात आले. अमृत अलोक याने स्पर्धेचा मानकरी बक्षीस पटकाविले तर अंकित जैन व सुतीर्थ बागची हे अनुक्रमे सवरेत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज ठरले.
संक्षिप्त निकाल
टेक महिंद्रा-११.२ षटकांत सर्वबाद ५१ (मधु कामत ३२, विनय कामत ३/५, संतोष देसाई २/९, प्रशांत पन्वर २/११) पराभूत वि. इन्फोसिस २ बाद ५७ (संदीप अभ्यंकर नाबाद ३०).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:12 pm