IPL 2020चं विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकलं. या हंगामात कोलकाताने पाचव्या स्थानी स्पर्धा संपवली. कोलकाताच्या संघाचे नेतृत्व सुरूवातीला दिनेश कार्तिकने केलं होते. पण काही सामन्यांनंतर मात्र कार्तिकच्या जागी इयॉन मॉर्गनने ही जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाचा भार आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबादारी कार्तिकला शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत कोलकाताचा संघ झुंज देत होता, पण अखेर त्यांना प्ले-ऑफ्स फेरी गाठण्यात अपयश आले. या स्पर्धेनंतर आता पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी त्यांनी कंबर कसली आहे. IPL 2021 लिलावाच्या आधी त्यांनी एकूण ५ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला असून अनेक खेळाडूंना संघात कायम राखले आहे.