विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमकतेची वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनी पाठराखण केली आहे. भारताचे फार थोडे खेळाडू प्रतिस्पध्र्याशी वाक्युद्ध करण्यात पटाईत आहेत. यापैकी एक कोहली आहे, असे रिचर्ड्सने म्हटले आहे.
तीन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करीत कोहलीने ८३.२च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत.
‘‘मला तो माणूस खूप आवडतो. लोकांनाही आता माहीत झाले आहे की, खेळात खूप बदल झाला आहे. भारताच्या सध्याच्या संघातील कोहली हा असा खेळाडू आहे की जो आक्रमकपणे प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडतो. त्याच्या खात्यावरील धावा पाहिल्यास तो मालिकेचा आनंद लुटतो आहे, हे प्रत्ययास येते,’’ असे रिचर्ड्सने सांगितले.