भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीच्या सर्वाधिक विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याकरिता विराट कोहलीला एका विजयाची आवश्यकता आहे.

भारताला कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी नेत धोनीने कर्णधार या नात्याने ६० सामन्यांमध्ये २७ विजय मिळवले आहेत. कोहलीने नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर भारताने ४६ सामन्यांमध्ये २६ विजय मिळवले आहेत. २०१८मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पहिल्यांदाच हरवण्याची करामत केली होती.