कोलकाता कसोटीत पहिल्या दिशवी चाचपडणाऱया भारतीय संघाने आता दुसऱया दिवसाअखेर सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. कसोटीच्या दुसऱया दिवशी वृद्धीमान साहाने चांगली फटकेबाजी करून नाबाद ५४ धावा केल्या. साहाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला ३०० धावांची वेस ओलांडला आली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंंडची सुरूवात निराशाजनक झाली. भुवनेश्वर कुमारने यावेळी भेदक मारा करत तब्बल ५ विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमीने लॅथमला माघारी धाडून संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर भुवनेश्वरने मार्टिन गप्तीलचा त्रिफळा उडवला. रवींद्र जडेजाने तिसरी विकेट मिळवली. त्यानंतर लगेचच पावसाच्या व्यत्ययामुळे सामाना काही काळ थांबविण्यात आला. पावसाच्या व्यत्ययानंतर भुवनेश्वरने आपली जादू दाखवून ठराविक अंतराने किवींच्या फलंदाजांना माघारी धाडले. भुवनेश्वरने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या. दुसऱया दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ७ बाद १२८ अशी होती. भारतीय संघाकडे अजूनही १८८ धावांची आघाडी आहे. त्यामुळे आता तिसऱया दिवशी देखील भारतीय गोलंदाज न्यूझीलंडचा डाव ३१६ धावांच्या आत रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी, कसोटीच्या दुसऱया दिवशी वृद्धीमान साहाने जोरदार फटकेबाजी करत नाबाद ५४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाला. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेला शिखर धवन केवळ एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय देखील यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. दोघांनाही न्यूझीलंडच्या मॉट हेन्रीने माघारी धाडले. कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात असताना त्यानेही निराशा केली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या हातात विसावला. कोहली केवळ ९ धावा करून माघारी परतला. भारतीय संघाचे पहिले तीन शिलेदार स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरून मैदानात चांगलाच जम बसवला. पुजाराने ८७ धावांचे, तर अजिंक्य रहाणेने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संघाला सावरले. रहाणे बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अश्विन देखील प्रत्येकी २ आणि २६ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूर्ण ९० षटकांचा होऊ शकला नाही. कमी सुर्यप्रकाशामुळे खेळ ८६ षटकांमध्येच थांबविण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद २३९ अशी आहे. रवींद्र जडेजा(०) आणि वृद्धीमान साहा(१४) धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून हेन्रीने तीन, तर फिरकीपटू जीतन पटेल याने दोन विकेट्स घेतल्या. बोल्ट आणि वँगर यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवली होती. India vs New Zealand - दिवसाभरातील अपडेट्स