महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तिन्ही संघांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली असली तरी पहिल्या दिवशी या तिन्ही संघांनी सपशेल निराशा केली.  
*  लाहली : आंध्र प्रदेशच्या शिवकुमार याने ४१ धावांमध्ये सहा बळी घेत महाराष्ट्राला ९१ धावांमध्ये गुंडाळले. पहिल्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने पहिल्या डावात ३ बाद ८७ धावा केल्या आहेत.
*  कटक : दिल्लीने मुंबईचा पहिला डाव १५६ धावांत गुंडाळला. मुंबईच्या निखिल पाटीलने झुंजार नाबाद ५४ धावा केल्या. दिल्लीकडून सुमीत नरवालने तीन बळी घेतले असून त्यांची दिवस अखेर १ बाद २० अशी स्थिती आहे.
*  जयपूर : मुरली विजय (९६) व विजय शंकर (नाबाद ९०) यांनी केलेल्या दमदार खेळामुळेच तामिळनाडूने विदर्भविरुद्ध पहिल्या डावात ४ बाद २३४ धावांची मजल गाठली.
*  इंदूर : रॉबिन उथप्पा (१५३) व लोकेश राहुल (९१) यांच्या आक्रमक १९४ धावांच्या भागीदारीमुळेच कर्नाटकने आसामविरुद्ध पहिल्या डावात २ बाद ३०२ धावांपर्यंत मजल गाठली.