कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी राजस्थानचा ३६-२७ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मानसी रोडेच्या दिमाखदार चढाया आणि शीतल मेहत्रेच्या लक्षवेधी पकडींचे महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचे योगदान होते. महाराष्ट्राच्या मुलांनी शेवटच्या सामन्यात झारखंडचा प्रतिकार ४८-१८ मोडून काढत ‘क’ गटात अग्रक्रम पटकावला. महाराष्ट्राच्या आकाश शिंदेने १७ चढाया करीत ११ गुण मिळवले. त्याला चढाईत तेजस पाटीलने १३ चढायात ९ गुण मिळवत, तर वैभव गर्जेने ५ पकडी करीत छान साथ दिली.