जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होणार नाही, या बीसीसीआयच्या भूमिकेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाठिंबा दिला आहे. पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर गांगुली बोलत होता. ‘‘क्रिकेट मालिका होण्यासाठी दहशतवाद पूर्णपणे थांबणे आवश्यक आहे. भारत-पाकिस्तान मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. ही मालिका क्रिकेट विश्वातील बहुचर्चित स्पर्धापैकी एक आहे. पण दहशतवादामुळे पीडित व्यक्तीचे दु:ख विसरून चालणार नाही.