करोनावरील लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा प्राधान्याने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंना प्राधान्य द्यावे, अशी मागणी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) केंद्र सरकारकडे केली आहे.

‘‘करोनावर लस ज्या वेळेस येईल तेव्हा ज्या मंडळींना प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा विचार व्हावा अशी विनंती आम्ही सरकारला केली आहे,’’ असे ‘एएफआय’चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.