विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत पराभूत झाल्यावर समाजमाध्यमांवर कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला कोहलीने चांगलेच फटकारले असून खिल्ली उडवणाऱ्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी, असे कोहलीने म्हटले आहे.
‘‘विश्वचषकात पराभूत झाल्यावर ज्या पद्धतीने समाजमाध्यमांवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्या असभ्य होत्या. व्यक्ती पातळीवर मी या गोष्टींमुळे दुखावलो आहे. या पराभवानंतर लोकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही लज्जास्पद होती,’’ असे कोहली म्हणाला.