कोलकाता येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत बंगालविरुद्ध होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी मुंबईच्या संघातून सहा जणांना वगळण्यात आले आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत बंगालविरुद्ध सामन्यासाठी संघ निश्चित करण्यात आला. कानपूरला पहिला निर्णायक विजय नोंदवणाऱ्या मुंबईच्या संघातील सहा जणांना डच्चू देण्यात आला आहे. हिकेन शाह, ब्राविश शेट्टी, प्रफुल्ल वाघेला, सुशांत मराठे, विशाल दाभोळकर आणि केव्हिन आल्मेडा यांना मुंबईच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी श्रीदीप मांगेला, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, सुफियान शेख, सर्फराझ खान आणि इक्बाल अब्दुल्ला यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक नायर, आदित्य तरे, श्रीदीप मांगेला, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सुफियान शेख, सर्फराझ खान, इक्बाल अब्दुल्ला, अक्षय गिरप, शार्दुल ठाकूर, विल्किन मोटा, बद्री आलम, क्षेमल वायंगणकर.