भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयात एकीकडे वार्षिक सर्वसाधारण सभेची वर्दळ सुरू असताना जवळच्याच वानखेडे स्टेडियमवरील मुंबई-उत्तर प्रदेश रणजी सामन्याचा तिसरा दिवस मात्र नीरस ठरला. हिमांशू अस्नोराचे शतक आठ धावांनी हुकले, तर उमंग शर्मा, पीयूष चावला आणि एकलव्य द्विवेदी यांनी अर्धशतके झळकावली. त्यामुळे उत्तर प्रदेशला तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५० धावा करता आल्या.
शतकाकडे कूच करणाऱ्या हिमांशूचा अभिषेक नायरने ९२ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर नायरनेच मुंबईकर सर्फराझ खानला (४४) बाद करून मुंबईला आणखी एक यश मिळवून दिले. उत्तर प्रदेशचा संघ अजून २६० धावांनी पिछाडीवर असून, सामना अनिर्णीत राहणार हे स्पष्ट झाले आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ६१० डाव घोषित
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ११७ षटकांत ५ बाद ३५० (हिमांशू अस्नोरा ९२, पीयूष चावला खेळत आहे ५४, उमंग शर्मा ५३, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ५०; अभिषेक नायर २/३७).