दिल्ली न्यायालयाने एस. श्रीशांतला दोषमुक्त केले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर घातलेली बंदी उठवलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्यासाठी केरळ क्रिकेट असोसिएशन (केसीए) प्रयत्नशील आहे.
‘‘श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्यासाठी आम्ही बीसीसीआयकडे अपील करणार आहोत. याबाबतचे पत्र लवकरच आम्ही बीसीसीआयला लिहिणार आहोत,’’ असे केसीएचे सचिव टी. एन. अनंतनारायण यांनी सांगितले.