दोन गटांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये वादाचं रुपांतर गोळीबारात होऊन तब्बल 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतात हा प्रकार घडला आहे. एबोताबाद जिल्ह्यात दोन गटांनी आपापसात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं होतं. मात्र क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटातील खेळाडूंच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

यादरम्यान दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर शस्त्र रोखून थेट गोळीबार करायला सुरुवात केली. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये सुमारे 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत अनेक लोकं या घटनेत गंभीर जखमी झाल्याचंही पोलिस उप-अधिक्षक एजाझ खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.