आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोलकात्यात पार पडलेल्या लिलावात सर्व संघमालकांनी आपापल्या पसंतीच्या खेळाडूंवर बोली लावली आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आगामी हंदामात नवीन नावाने मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेला निमित्त ठरलं…ते RCB ने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन संघाचा लोगो हटवण्याचं…

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचं नाव बदल्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याविषयी लवकरच घोषणा केली जाऊ शकते. सोशल मीडियावर झालेल्या या बदलांमुळे युजवेंद्र चहलनेही ट्विटरवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

याआधी दिल्लीच्या संघानेही आपलं नाव बदललं होतं. दिल्ली डेअरडेविल्सवरुन संघ दिल्ली कॅपिटल्स या नावाने मैदानात उतरला होता. आश्चर्यकारकरित्या दिल्लीच्या संघाला याचा फायदाही झाला होता. त्यामुळे बंगळुरुचं प्रशासन कोणत्या नवीन नावाने मैदानात येतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Once Upon a Time in Rajasthan : पाहा, आयपीएलच्या संघांचा फिल्मी अंदाज