सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीत आहे. या मालिकेतील 2 सामने झाले अडून त्यातील एक सामना भारताने लढत देऊन गमावला तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या कारणामुळे सध्या भारतीय चाहते काहीसे अस्वस्थ असून विराट सेना फॉर्ममध्ये येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीयांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्याने ट्विटच्या माध्यमातून भारतीयांना शुभेच्छा दिल्या असून या भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मरण केले आहे. त्याने लिहिले आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि अत्यन्त कष्टाने मिळते. त्यापैकी एक म्हणजे आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य. याशिवायही अशा अनेक अगणित गोष्टी आहेत, ज्यामुळे आज 'टीम ईंडीया' अस्तित्वात आहे. जर या भारतमातेसाठी शूरवीरांनी बलिदान दिले नसते, तर आज 'टीम इंडिया' नसती, असेही त्याने या संदेशात लिहिले आहे. Everything in life is hard-earned. Just like our independence. Among countless other things, there would have been no ‘Team India’ if not for the sacrifice of our brave freedom fighters. Let us not take that freedom for granted. #HappyIndependenceDay pic.twitter.com/RYrveJ9P7y — Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2018 दरम्यान, शूरवीरांनी दिलेले बलिदान हे अमूल्य आहे. त्यामुळे आपले स्वातंत्र्य हे गृहीत धरू नका, असेही सचिनने लिहीले आहे.