रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान भारतीय पथकाचा सदिच्छादूत असणार आहे. विविध कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सलमानची अचानकच एका कार्यक्रमात सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘‘ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,’’ अशा शब्दांत सलमानने आपल्या भावना प्रकट केल्या.