भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे ऑक्टोबर २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर शशांक मनोहर यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला होता. आयसीसीच्या प्रमुखपदासाठी मनोहर यांचे नाव शर्यतीत असल्याने त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार तसेच अजय शिर्के यांची नावे चर्चेत आहेत. पवार सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तर शिर्के महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत बीसीसीआयला जाब विचारला. लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि सूचना या बीसीसीआयच्या सदस्यांच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाला मुदतीचे बंधन असेल, पदाधिकाऱ्याचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे, एका राज्यात एकच संघटना असावी (या शिफाशीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र आणि गुजरातला बसू शकेल) तसेच मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पदाधिकारी होता येणार नाही, अशा शिफारशींचा यात समावेश आहे. Lawyer for BCCI submits in Court that implementation of Justice Lodha Committee report will lower the quality of game #BCCI — ANI (@ANI_news) May 10, 2016 CJI Thakur tells BCCI: All is not well with you. Why are you so apprehensive? Court to hear the matter on June 29. — ANI (@ANI_news) May 10, 2016 Lawyer for BCCI submits in Court that implementation of Justice Lodha Committee report will lower the quality of game #BCCI — ANI (@ANI_news) May 10, 2016