मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत झगडणाऱ्या मुंबईच्या संघात १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यासाठी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे. माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवला या सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. मुंबईच्या खात्यावर चार सामन्यांत ५ गुण जमा असून, अ-गटात हा संघ आठव्या स्थानावर आहे.मुंबईचा संघ : सिद्धेश लाड (कर्णधार), श्रेयस अय्यर, जय बिस्ता, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, कर्श कोठारी, विक्रमांत औटी, ध्रुमिल, मटकर, रॉयस्टन डायस, मिनाद मांजरेकर, शुभम रांजणे, भूपेन लालवानी आणि बद्री आलम.