ऋषभ पंतचे भारतीय संघातील महत्त्व अधोरेखित झाले असून त्याला आणखी काही काळ वेळ दिल्यास त्याचे यष्टीरक्षणही सुधारेल, अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने व्यक्त केली.

‘‘पंत आणि माझ्यात नि:स्वार्थ मैत्री असून आम्ही दोघेही एकमेकांना सातत्याने साहाय्य करत असतो. मुळात ज्याप्रमाणे कोणी सुरुवातीलाच गणिताची समीकरणे सोडवू शकत नाही, त्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया समजून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे पंतही यष्टीरक्षणात लगेचच यशस्वी होऊ शकत नाही. त्याला यष्टीरक्षण सुधारण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा,’’ असे साहा म्हणाला.