भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिवपदी, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होणेही जवळपास निश्चित आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय २३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात येणार आहे.

विराट कोहली हा भारताचा गौरव!; गांगुलीने उधळली स्तुतीसुमने

सौरव गांगुली हा BCCI च्या अध्यक्षपदापासून केवळ एका घोषणेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाबाबत मत व्यक्त केले. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी क्रिकेटपटूकडे क्रिकेट बोर्डाचा कारभार जाणार याबाबत समाधान व्यक्त केले. “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) जबाबदारी एका क्रिकेटपटूकडे गेल्याचे मला समाधान वाटते. सौरव गांगुली हा गेली ४ ते ५ वर्षे प. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे क्रिकेटपटू आणि प्रशासकीय कामकाज असा दोनही प्रकारचा अनुभव आहे. त्यामुळे तो BCCI चा कारभार सक्षमपणे सांभाळू शकतो. त्याच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट अधिकाधिक चांगली कामगिरी करेल”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

सौरव गांगुली भाजपाचा प. बंगालचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल का?

दरम्यान, BCCI ची २३ ऑक्टोबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Video: “असा खेळत राहिलास तर…”; पत्रकाराने प्रश्नातूनच केला पाकिस्तानच्या कर्णधाराचा अपमान

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबरला BCCI कडून जाहीर केली जाईल. तर १६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला निवडणूक पार पडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार आहे.