काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील खो-खो प्रकारात भारताच्या दोन्ही संघांनी श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीमधील स्थान पक्के केले आहे.

सोमवारी अव्वल साखळी पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर १७-५ असा एक डाव आणि १२ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या दीपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे, ३० सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, महिला गटात भारताने नेपाळवर ११-३ असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव केला.