सुशील कुमार व योगेश्वर दत्त या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मल्लांनी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापती टाळण्याबरोबरच तंदुरुस्ती वाढवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ४ ते १८ सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे. अमित कुमार आणि बबिता कुमारी यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.