ख्राइस्टचर्च : कसोटी हा क्रिकेटचा मूळ प्रकार असून त्याला नाहीसे करून ट्वेन्टी-२० सामन्यांची संख्या वाढवली, तर ट्वेन्टी-२० सामन्यांनाच धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे माजी गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून पाचऐवजी चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्याच्या संकल्पनेविषयी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे मत मांडले. ‘‘कसोटी हा क्रिकेटचा पाया आहे. त्याची जपणूक करणे आपले कर्तव्य असून चार दिवसांची कसोटी खेळवून चुरस कमी करू नये,’’ असे हॅडली म्हणाले.