ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र ट्रोल होत आहेत. भारताने मालिका जिंकल्यानंतर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी पत्रकारपरिषदेमध्ये विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच या ऐतिहासिक विजयासाठी आम्ही मागील अनेक महिन्यांपासून तायरी करत असल्याचे सांगितले. या पत्रकारपरिषदेनंतर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची नावे टॉप ट्रेण्डिंग होतं होती. ‘हा मालिका विजय १९८३ साली मिळवलेल्या विश्वचषक स्पर्धेतील विजयापेक्षाही मोठा आहे’, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. मात्र अनेकांना ही तुलना पटली नाही. या वक्तव्यावरून तसेच तिसऱ्या कसोटीमध्ये बियर पितानाच्या फोटोंवरून शास्त्री गुरुजींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. बऱ्याच जणांनी शास्त्री गुरुजींची मस्करी करणारे विनोदी फोटो आणि भन्नाट विनोद ट्विट केले आहेत. पाहुयात असे काही व्हायरल ट्विटस

नेटकरी शोधतायत याचं उत्तर

फरक

आपल्याला काय दिसतं आणि…

रवी शास्त्रींचा विजयातील वाटा

विजयानंतर रवी शास्त्रींची हॉटेल रुम

पुन्हा एकदा फरक

आधी आणि नंतर

वेडाय का

मेक इट लार्ज

ती तुलाना किती योग्य

मालिका विजयानंतर लॉग ड्राइव्ह

रवी शास्त्री आणि विराट कोहली</p>

नवा स्कोअरकार्ड

ते ड्रेसिंग रुममध्ये असतानाही जिंकलो

रवी शास्त्री हॉटेलरुमवर जाताना

जाता जाता

सध्या तरी भारतीय संघ आणि चाहते मालिका विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असले तरी कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे लवकरच भारतीय संघ पुन्हा नेट्समध्ये सराव करताना दिसेल.