पुद्दुचेरी : सियाचेम स्टेडियम, पुद्दुचेरी येथे झालेल्या महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत मुंबईने झारखंडचा सात गडी राखून पराभव केला. मुबंईची कर्णधार मनाली दक्षिणी, मंजिरी गावडे आणि जान्हवी यांनी प्रत्येकी दोन गडी मिळवून झारखंडला २० षटकांत ९ बाद ६३ धावांवर रोखले. झारखंडतर्फे कर्णधार सोनियाने सर्वाधिक १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वृशाली भगत (नाबाद २९) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१४) यांच्या योगदानामुळे मुंबईने १३.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.