भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवकडे आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. केदार जाधवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत संधी मिळाली नव्हती. विश्वचषकात केदारला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं, मात्र या स्पर्धेतही त्याला हवीतशी संधी मिळाली नाही. त्यामुळे विजय हजारे करंडकातून सर्वोत्तम कामगिरी करत आपलं स्थान बळकट करण्याकडे केदार जाधवचा कल असणार आहे.

विजय हजारे करंडकासाठी असा असेल महाराष्ट्राचा संघ –

केदार जाधव (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उप-कर्णधार), अंकित बावने, सत्यजित बच्छाव, अवधूत दांडेकर, निकीत धुमाळ, समद फल्लाह, ऋतुराज गायकवाड, स्वप्नील गुगले, दिव्यांग हिमगानेकर, अझीम, शमशुझ्मा काझी, मुकेश चौधरी, नौशाद शेख, यश नहार