महेंद्र सिंह धोनीने सलग १० वर्षे कर्णधारपद भूषवल्यानंतर आता तो पहिल्यांदाच इतक्या काळानंतर केवळ एक यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या रुपात दिसला. असे असली तरी  त्याचा मैदानावरचा वावर इतका सहज होता की त्याने कर्णधारपद सोडले किंवा नाही याची जणू त्याला पर्वाच नव्हती. इतके वर्षे कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर साहजिकच त्याच्याजवळ अनुभवाचा खजिना इतरांपेक्षा जास्त राहणारच. तेव्हा त्याने अनेक वेळा या गोष्टीची झलक दाखवून दिली. धोनीच्या या अनुभवाचा सर्वाधिक फायदा झाला तो पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचा कर्णधार झालेल्या विराट कोहलीला.

२००७ नंतर पहिल्यांदाच धोनी हा यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या रुपात खेळताना दिसला. कर्णधारपद असो वा नसो धोनीकडे नेतृत्वगुण हे नैसर्गिकरित्याच आहेत हे त्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे. कॅप्टन कूल म्हणून नावारुपाला आलेल्या धोनीने आपल्या निर्णयामुळे सामन्यामध्ये रंग भरले. त्याच्या या निर्णयांचा फायदा झाल्याचे विराट कोहलीनेच सांगितले. तीन दिवसाच्या या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली आहे. कोहलीने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळत शतकही ठोकले.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा

जेव्हा खेळाला सुरुवात झाली तेव्हा सातव्याच षटकात धोनीच्या चाणाक्षतेची झलक पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराहने डीप फाइन लेगवरुन बॉल फेकला आणि तो थेट यष्टीवरच येऊन आदळला. तो बॉल तेव्हा डेड झाला नव्हता. अशा वेळी फलंदाज हे एक चोरटी धाव काढतात. परंतु धोनीने ही शक्यता आधीच ओळखली आणि त्या बॉलला थांबवण्याची सूचना त्या ठिकाणी असलेल्या फील्डरला दिली.

मैदानावर असलेल्या प्रेक्षकांच्या चीअरिंग आणि गोंगाटामुळे बऱ्याचदा असे होत होते की कोहलीचा आवाज क्षेत्ररक्षकापर्यंत पोहचत नव्हता. त्यामुळे कोहलीच्या सूचना खेळाडूंपर्यंत पोहचत नव्हत्या. नवव्या षटकावेळी जेव्हा शिखर धवनला स्लीपवरुन हटवून मिडविकेटवर ठेवायची कर्णधार विराटची इच्छा होती. परंतु गोंगाटामुळे त्याला हा संदेश पोहचलाच नाही.

धोनीचे मात्र या गोष्टीकडे बारकाईने लक्ष होते. त्याने ती सूचना शिखर धवनला दिली. याबरोबरच मैदानात फिल्डिंग कशी लावण्यात आलेली आहे याकडे देखील त्याने लक्ष ठेवले. इतकेच नव्हे तर त्याला काही बदल हवे असतील ते त्याने सूचवले आणि विराट कोहलीने ते मान्य देखील केले. २९ व्या षटकांमध्ये पॉइंटवर असलेल्या फील्डरला धोनीने सर्कलच्या आत फिल्डिंगला लावले. त्यामुळे त्या ठिकाणी जो रुट चोरट्या धावा काढू शकला नाही. अशा अनेक ठिकाणी निर्णय घेऊन सामना जिंकण्यास धोनीने हातभार लावला.