छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि कोल्हापूर संघांनी आपला विजयी धडाका कायम ठेवला. यजमान मुंबईसाठी शनिवार संमिश्र यशाचा ठरला.
वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यात काल चार-चार विजयांची नोंद करणाऱ्या कोल्हापूरला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. मुलींच्या १८ वर्षांखालील गटात मुंबईचा २५-३,२५-१० व २५-१२ असा धुव्वा उडवल्यानंतर त्यांच्या १८ वर्षांखालील मुलांना अमरावतीकडून  ३०-३२, २५-२२,२५-२०,१८-२५ आणि १५-९ अशी हार सहन करावी लागली. मात्र अमरावतीला नाशिककडून २५-१३,२५-४ आणि २५-७ असा मार खावा लागला. पुण्याने लातूरवर २५-६,२५-४, २५-७ असे हरवले. त्यानंतर २१ वर्षांखालील युवतींच्या गटात कोल्हापूरने लातूरवर २५-११,२५-१० आणि २५-८ अशी मात केली.