Premium

पुन्हा नव्याने सुरुवात! कसोटी क्रिकेटमध्येही सकारात्मक खेळ करण्याचा रहाणेचा निश्चय

जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्येही सकारात्मक खेळ करण्याचा निश्चय केला आहे.

ajinkya rahane
अजिंक्य रहाणे

पीटीआय, अरुन्डेल (पोर्ट्समथ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्येही सकारात्मक खेळ करण्याचा निश्चय केला आहे. तसेच भूतकाळाबाबत विचार न करता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार असल्याचेही रहाणे म्हणाला.रणजी करंडक आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गेल्या हंगामातील दमदार कामगिरीच्या बळावर रहाणेने भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या १६व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना रहाणेने १४ सामन्यांच्या ११ डावांत १७२.४८च्या धावगतीने ३२६ धावा केल्या. त्याने १६ षटकारही मारले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ चेंडूंत ६१ धावांची, तर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २९ चेंडूंत नाबाद ७१ धावांची खेळीही साकारली. त्याने आपल्या खेळात केलेल्या सुधारणेमुळे त्याचे बरेच कौतुकही झाले. आता ७ जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातही असाच सकारात्मक खेळ करण्यासाठी रहाणे उत्सुक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 00:19 IST
Next Story
हार्दिकने कसोटी क्रिकेटकडे लवकर पाठ फिरवली – लान्स क्लूजनर