scorecardresearch

Premium

Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाला.

INDIA TEAM
भारतीय क्रिकेट संघ (संग्रहित फोटो)

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या अटीतटीच्या लढती होत आहेत. सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाला. याच कारणामुळे सध्या भारतीय संघापुढे ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे. भारताला या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरोधातील सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> INV vs PAK Virat Kohli : ‘…वाटले आता करिअर संपले’ विराट कोहलीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, म्हणाला “रात्रभर…”

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

सुपर-४ फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामने खेळवले जात आहेत. या फेरीमध्ये हे चारही संघ एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने या फेरीतील पहिला सामना गमावला आहे. तर ६ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि ८ सप्टेंबर रोजी अफागणिस्ताविरोधात भारताची लढत होणार आहे. सुपर-४ फेरीमध्ये गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळावला जाणार आहे. याच कारणामुळे भारताला आगामी दोन्ही सामन्यामंध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा या दोनपैकी एकाजरी सामन्यात भाराताचा पराभव झाला तर अन्य संघांच्या कामगिरीवर भारताला अवलंबून राहावे लागणार आहे.

IND vs PAK : पाकिस्तानच्या मुलींमध्ये कोहलीची क्रेझ, भारत-पाक सामन्यातील ‘या’ खास फोटोची होतेय चर्चा

भारतापुढे पेच काय?

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हाँगकाँगविरोधातील सामन्यात जायबंदी झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. भारताचा हा हुकुमी एक्का गमवावा लागल्यामुळे कॅप्टन रोहित शर्मासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. जडेजाच्या जागेवर एका सामन्यात दीपक हुडाला संधी दिली गेली. मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. तसेच पाकिस्तानविरोधातील सामन्यात हार्दिक पंड्यादेखील सपशेल अपयशी ठरला. त्याला खातेदेखील खोलता आले नाही. याच कारणामुळे श्रीलंकेविरोधात सर्वोत्तम संघाची निवड करण्याचे दिव्य रोहित शर्मासमोर असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 22:38 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×