केप टाऊन : हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या एकदिवसीय संघाचा ताळमेळ बिघडल्याची कबुली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला एकदिवसीय मालिकेत ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. या मालिकेत सहा ते आठव्या Rमांकावरील खेळाडूंकडून चमकदार कामगिरी न झाल्याचा भारताला फटका बसल्याचे द्रविडने सांगितले.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

‘‘कोणत्याही संघाचा समतोल साधण्यासाठी सहा ते आठ क्रमांकावरील खेळाडू महत्त्वाचे असतात. कारण ते तुमच्यासाठी दुहेरी योगदान देऊ शकतात. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आमच्याकडे तसे खेळाडू नव्हते. त्यामुळे हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा जेव्हा पूर्ण तंदुरुस्तीसह संघात परततील, तेव्हा आपोआप संघाचा समतोल साधला जाईल,’’ असे द्रविड म्हणाला. त्याशिवाय द्रविडने कर्णधार के. एल. राहुलचा बचाव करताना भविष्यात राहुल कर्णधार म्हणून अधिक प्रगल्भ होईल, असे मत व्यक्त केले.