विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत (India vs South Africa) पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे. त्याने २०१४ मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून हे पद स्वीकारले. विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.”

Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी; मुस्तफिझूर रहमान विजयाचा शिल्पकार
IPL 2024 Sachin Tendulkar explained how to face the bowlers
IPL 2024: सचिन तेंडुलकरचा कानमंत्र, गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाने बॉल कसा ओळखावा? वाचा नेमकं काय म्हणाला

हेही वाचा – BIG BREAKING..! विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद!

३३ वर्षीय विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील कप्तानपद सांभाळलेल्या ६८ सामन्यांमध्ये विराटने एकूण ५८६४ धावा केल्या.