Ravindra Jadeja Interview: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा सामनावीर ठरला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. या सामन्यानंतर अक्षर पटेलने बीसीसीआय टीव्हीवर रवींद्र जडेजाची मुलाखत घेतली. बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

मुलाखतीची सुरुवात करताना अक्षर पटेल म्हणाला, ”मला माझा स्वतःचा चहल टीव्ही सुरू करावा लागेल असे दिसते. मीच पुन्हा पुन्हा माईक धरतोय. शमी आपल्यासोबत नागपुरात होते. आता सर रवींद्र जडेजा आले आहेत. मी बापू म्हणणार नाही, कारण आम्ही दोघेही बापू आहोत.”

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
A dream come true Man kneels on the ground and takes a selfie with a rickshaw watch the heartwarming VIDEO
स्वप्नपूर्ती! कष्टाच्या कमाईतून घेतली रिक्षा; व्यक्तीने गुडघे जमिनीवर टेकून रिक्षाबरोबर घेतला सेल्फी, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Hayden gives batsman Tips to face Mayank
IPL 2024 : मयंक यादवचा झंझावात कसा रोखायचा? मॅथ्यू हेडनने फलंदाजांना दिला गुरुमंत्र
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

अक्षर पटेल पुढे म्हणाला, “सर, मला गोलंदाजी येत नाही. अक्षरला गोलंदाजी द्यायची नाही, म्हणूनच अशी गोलंदाजी करताय का? मानसिकता काय असते? हे ऐकून रवींद्र जडेजा आधी हसला आणि मग म्हणाला, नाही, भारताकडे अशी विकेट असेल तर नक्कीच बरे वाटते, कारण स्पिनरची भूमिका वाढते आणि जबाबदारीही वाढते.”

जडेजा पुढे म्हणाला, “प्रयत्न राहतो की त्यांची फलंदाजी कशी आहे… ते स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे एकच प्रयत्न होता की स्टंप टू स्टंप बॉलिंग अधिक चांगली होईल. जर त्यांनी मिस केले तर चेंडू खाली राहील आणि स्टंपला लागेल. सुदैवाने असे घडले आणि पाचवेश स्टंपचा जोरात आवाज आला.”

अक्षर पटेल म्हणाला, “पण तुम्ही फक्त गोलंदाजी करत नाही तर फलंदाजीही करतीय. जेव्हा कठीण परिस्थिती होती आणि विराट भाईसोबत तुम्ही ५० धावांची भागीदारी केली होती, तेव्हा तुम्ही सामना कशा पद्धतीन पाहत होता आणि तुम्ही फलंदाजीच्या वेळी तो पाहिला नाही, मग अशा कठीण परिस्थितीत तुम्ही कोणत्या मानसिकतेतून जाता? रवींद्र जडेजा म्हणाला, त्यावेळी परिस्थिती थोडी कठीण होती, कारण ३-४ षटकांत ४ विकेट पडल्या होत्या. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देऊन भागीदारी करण्याचा हा प्रयत्न होता.”

हेही वाचा – PSL 2023: जमान खानने मलिंगा स्टाईलने जेम्स विन्सला केले क्लीन बोल्ड; फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

रवींद्र जडेजा म्हणाला, “या विकेटवर चांगला चेंडू केव्हाही पडू शकतो, अशी त्याची मानसिकता होती. पण स्वत:च्या बचावावर विश्वास ठेवून बॅट पॅडसमोर ठेवून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मी आणि विराट शक्य तितके सरळ खेळण्याबद्दल बोलत होतो. कारण चेंडू तेवढा उसळत नव्हता. काही चेंडू खाली राहत होते.”

हेही वाचा – Indian Test team Vice-captain: केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर ‘या’ तीन खेळाडूंमध्ये चुरस, जाणून घ्या कोण आहेत?

अक्षर पटेलने हसत विचारले, “जसे तुम्ही ६ महिने ब्रेकवर होता. तर, तुम्ही घरी असा विचार करत होता की, तुम्ही निघाल्याबरोबर तुम्हाला थेट सर्वकाही वसूल करायचे आहे. गुजराती मनात हेच चालले होते का? हे ऐकून रवींद्र जडेजाही जोरात हसायला लागला, मग म्हणाला, हो यार, खरंच खूप क्रिकेट मिस केले. विश्वचषक हुकला. खूप मालिका हुकल्या. त्यामुळे ते थोडे होते. आशा आहे की हे असेच चालू राहील आणि टीम इंडिया जिंकत रहावी, मी, तू आणि अश्विन तिघेही मिळून, कारण भारतात फिरकीपटूची भूमिका वाढते.”