Team India Unwated Records In India vs England T20I Series: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला आतापर्यंत एकही टी-२० सामना जिंकता आलेला नाही. आधी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात २- ० ने मालिका गमावली. आता इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत इंग्लंडने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना ब्रिस्टलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाच्या नावे ९ नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
१) ५ सामने गमावणारा पहिलाच कर्णधार
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला एकही टी-२० सामना जिंकता आलेला नाही. आधी आयर्लंडविरुद्ध खेळताना २ आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना लागोपाठ ३ सामने गमावल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. श्रेयस हा लागोपाठ ५ सामने गमावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
२) सर्वात जलद ५ सामने गमावणारा पहिलाच कर्णधार
श्रेयस अय्यर हा सर्वात जलद ५ टी-२० सामने गमावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. श्रेयसने ६ पैकी ५ सामने गमावले आहेत. याआधी विराटने १२ पैकी ५ सामने गमावले होते. तर धोनीने १५ पैकी ५ आणि हार्दिकने १६ पैकी ५ सामने गमावले होते.
३) लागोपाठ टी-२० मालिका पराभव
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारताचा संघ लागोपाठ २ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकणारा संघ आहे. २०१९ नंतर भारताने पहिल्यांदाच लागोपाठ २ टी-२० मालिका गमावल्या आहेत. याआधी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २-१ ने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
४) इंग्लंडचा पहिलाच मालिका विजय
हा विजय इंग्लंडसाठी ऐतिहासिक आहे. कारण इंग्लंडने आतापर्यंत टी-२० मालिकेत भारतीय संघाला पराभूत केलं नव्हतं. हे पहिल्यांदाच घडलं आहे.
५) भारताचा विजयरथ रोखला
गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.२०१९ नंतर झालेल्या सर्व टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे. पण इंग्लंडने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.
६) ब्रिस्टलच्या मैदानावर पहिल्यांदाच असं घडलं
ब्रिस्टलच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.या मैदानावर खेळताना भारतीय संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना गमावला नव्हता. पण २७ वर्षांनंतर भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
७) इंग्लंडचा सर्वात मोठा विजय
हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला १५९ धावा करायच्या होत्या. य़ा धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. हा इंग्लंडचा भारतीय संघावर मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे.
८) भारताचा सर्वात मोठा पराभव
हा भारताचा १५० धावांचा बचाव करताना झालेला सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी भारतीय संघाने कधीच १५० धावांचा बचाव करताना ३७ किंवा त्याहून जास्त चेंडू शिल्लक ठेवून सामना गमावला नव्हता.
९) १२ मालिकांनंतर पहिला पराभव
भारतीय संघाने गेल्या १२ टी-२० मालिकांपैकी ११ मालिका जिंकल्या होत्या. यादरम्यान १ मालिका बरोबरीत राहिली होती. पण भारतीय संघाला गेल्या दोन्ही मालिकांमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
