भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. या दरम्यान रोहित शर्माने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

गुरुवारी बांगलादेशमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिले सराव सत्र घेतले. रविवारी वनडे सामन्यापूर्वी टीम इंडिया आज अखेरचा सराव करणार आहे.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “गेल्या ७-८ वर्षांपासून बांगलादेश एक आव्हानात्मक संघ आहे. आम्हाला त्यांच्याविरुद्ध सहज विजय मिळाला नाही आणि त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. २०१५ मध्ये आम्ही येथे एक मालिका गमावली होती. आमच्यासाठी हे सोपे जाईल असा विचार करून आम्ही येथे आलो नाही. ते खूप चांगला संघ आहे.”

टीम इंडिया विश्वचषकाचा विचार करत आहे का, असे विचारले असता रोहित म्हणाला की, संघ फार पुढचा विचार करत नाही.

हेही वाचा – VIDEO:’फोटो क्या ले रहे हो यार’, रोहित शर्मा आधी फोटोग्राफरवर रागावला, नंतर स्वत:च फोटोसाठी दिली पोज

रोहित म्हणाला, “पण एक संघ म्हणून आम्हाला कुठे सुधारणा करायची आहे यावर आम्ही लक्ष ठेवू. एकाच वेळी इतक्या गोष्टींचा विचार न करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, जसे की आपल्याला हे किंवा ते संयोजन वापरायचे आहे, आपल्याला ही व्यक्ती किंवा ती व्यक्ती किंवा वर्ल्ड कपमध्ये खेळायचे आहे. मला आणि प्रशिक्षकाला आम्हाला काय करायचे आहे, याची कल्पना आहे. विश्वचषक जवळ आल्यावर आम्ही ते कमी करू. आम्हाला फक्त विश्वचषकापर्यंत चांगले क्रिकेट खेळायचे आहे.”

खेळाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल विचारले असता, रोहित म्हणाला, “व्यावसायिक म्हणून आम्हाला वेगवान वाटचाल करावी लागेल. आम्ही खेळाडूंचे व्यवस्थापन करतो, मोठे चित्र लक्षात ठेवून आम्ही त्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी विश्रांती देतो. नेहमीच भरपूर क्रिकेट होणार आहे, तुम्हाला ते मॅनेज करावे लागेल. त्याच ठिकाणी आपला सर्वोत्तम खेळ करणे आणि १० डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे अंतिम सामना खेळणे या दिवसात आणि वयात शक्य नाही.”

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, लोकेश राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, उमरान मलिक</p>

बांगलादेशचा एकदिवसीय संघ: लिटन दास (कर्णधार, यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामुल हक (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नुरुल हसन, इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद